रपरपलेल्या उन्हाने जमिनीची दाह होत असताना कुठेतरी पावसाचे थेंब आज जमिनीवर कोसळले आणि त्या जमिनीने अक्षरशः अधाशासारखं ते पाणी पिऊन टाकलं. ह्या परिस्थितीत देखील परतावा म्हणून जमिनीने मातीचा सुगंध दिला ज्याची तुलना कशाशीच नाही. ओलावा जपला तर परतावा मिळतो नक्की, मग तो मातीचा असो वा नात्यांचा.!
-चैतन्य दातखिळे
दि. १६-मार्च-२०२३
No comments:
Post a Comment