निरोप...नेहमीच त्रासदायक वाटणारा शब्द. कुणी आपल्याला दिलेला निरोप तर कधी आपण कुणाला दिलेला निरोप हा मनात नेहमीच काहीतरी सल ठेवून जातो. जवळच्या व्यक्तीनं सांगून घेतलेला निरोप निःसंदेह दुःख देणारा,पण न सांगून घेतलेला निरोप त्याहून दुःख देणारा असतो. कधीकधी कुणी आपला निरोप घेईल ह्या विचारानेच काळजात धस्स होतं तर निरोप घेतल्यावर काय होईल ह्याचा विचार न केलेलाच बरा. कधी वाईट तर कधी चांगल्यासाठी निरोप घेतलाही जातो, मात्र त्यातून होणारी ताटातूट हि आलीच.
तसा निरोप कधी चांगलाही...मनाने दूषित विचारांना, ज्ञानाने अज्ञानाला, स्त्रीने मत्सराला, पुरुषाने अहंकाराला आणि विद्यार्थ्याने आळसाला निरोप दिला तर किती चांगलं होईल. पण निरोप देणार कोण?
-चैतन्य दातखिळे
दि.२१-१०-२०२३
No comments:
Post a Comment