सकाळी सकाळी जर आपण कुठे शहरातील चौकात गेलो तर तिथे हातात जेवणाचा डबा घेऊन खाली बसलेले बिगारी बऱ्याचदा दिसतात. मग कुणीतरी माणूस येऊन काम सांगतो आणि हे लोक मिळेल ते काम हाती घेतात आणि ठरलेल्या मोबदल्यात दिवसभर करतात. काम करताना आपल्या आवडीचं काम मिळेलच ह्याची अजिबात शाश्वती नाही, काम मिळतंय हिच फार मोठी गोष्ट त्यांच्यासाठी. आज काम केल्यावर काही मोठी गोष्ट करावी किंवा घ्यावी म्हटलं तर कधी पुरेसे पैसे नाहीत किंवा उद्या काम मिळेल ह्याचा भरवसाही नाही.
आपली अवस्था सुद्धा त्या बिगाऱ्यासारखीच. नशीब आपल्याला काय देऊन जाईल ह्याची खात्री नाही. दिलं काही तरी स्विकारण्याशिवाय पर्याय नाही.आणि काही शाश्वत करायचं म्हटलं तर आपला भरवसाही नाही.
-चैतन्य दातखिळे
दि.२०-१०-२०२३
No comments:
Post a Comment