"यात्रीगन कृपया ध्यान दे" अशी अनाऊन्समेंट ऐकली आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवर बसलेल्या माणसावरची माझी स्थिर नजर हटली. कितीतरी वेळ फोनवर बोलून तो कुणाची तरी रडत समजूत काढत होता असं प्रथमदर्शनी वाटलं. तसं पुरुष म्हटलं कि निष्ठुर, कठोर मनाचा, भावनाराहित असं बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळतं, पण सगळेच पुरुष तसे नसतात...किमान त्याच्याकडे बघून तरी मला तसं वाटलं. हताश होऊन फोन ठेवल्यावर कितीतरी वेळ तो रेल्वे ट्रॅक कडे शून्य नजरेने बघत होता. त्यावेळी त्याच्या मनात काय काय विचार आले असतील देव जाणे. त्याची पुढची प्रतिक्रिया काय असेल ह्या उत्सुकतेपोटी मी माझ्या १-२ ट्रेन सोडल्या देखील. पण तो मात्र तसाच स्तब्ध बसून होता. अजून कितीवेळ बसणार होता माहित नाही, शेवटी कंटाळून मी माझी ट्रेन पकडली आणि पुढील प्रवासाला लागलो.
जीवनात काय किंवा प्रवासात काय प्रत्येकाला त्याच्या शेवटच्या ठिकाणावर पोहोचता येईलच असं नाही. काहींचा प्रवास अर्ध्यापर्यंत जातो तर काहींचा प्रवास सुरूच होत नाही.
-चैतन्य दातखिळे
दि.१५-१०-२०२३
No comments:
Post a Comment