अथांग, विशाल, महाकाय अशी नानाविध विशेषणं लाभलेला सागर. बेमालूमपणे स्वतःच्या मस्तीत आणि तितकाच शिस्तीत भासणारा. काही चांगलं-वाईट घडलं त्याच्यामुळे तरीही नाव फक्त त्याचंच. पण ह्या सगळ्यात त्याच्यात सामावून गेलेल्या तिचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. डोंगरदऱ्यांच्या कानाकोपऱ्यातून वाहत येऊन आपलं प्रचंड मोठं विस्तीर्ण साम्राज्य उभी करणारी ती सरिता, कित्येक गाव वाड्यांची, गुरा ढोरांची अन हरेक जीवाची तहान आपल्या गोड चवीने भागवणारी सरिता जेव्हा त्या सागरास जाऊन मिळते तेव्हा तिला तिचं अस्तित्वही मागे ठेऊनच यावं लागतं. इतकच कि काय आपली गोड चव विसरून खारट चवही ती अंगिकारते.
म्हणूनच कि काय ऐक वेळ तिचं अस्तित्व सागरासोबत जाणवत नसेलही, मात्र अनादी अनंत काळ तिची जलदेवता म्हणून पूजा करून जो बहूमान तिला मिळतो ते भाग्य सागरापाशी नाही...किंचितही नाही.
-चैतन्य दातखिळे
दि.१३-१०-२०२३
No comments:
Post a Comment