पैली माणसं लै निवांत व्हती...ना कस्ली चिंता ना कंचा डोसक्यात इच्चार. आला दिवस ढकलायचा येवढंच त्यास्नी ठावं असायचं. झालं येकांद काम तर झालं नायत आपल्या नशिबात न्हवतं आसं म्हणून सुडुन द्यायचं अस्सा निवांतपणा. मला लै अप्रूक वाटायचं आसं जुन्या माणसांचं कधी काय आयकल की. म्हटलं व्हावं आपुन बी निवांत पहिल्या माणसांसारखं, काय व्हतंय त्याला. आसा इच्चार कर्तो ना कर्तो तोच ब्यांकेचा घरच्या हापत्याचा म्यासेज आला आन आख्या इचारावं पाणी फिरलं, लागलो पुण्यास्नी व्हतो तसा गपगुमान कामाला.
निवांतपणा वगैरे काय नस्तोय बघा....
-चैतन्य दातखिळे
दि. ११-१०-२०२३
No comments:
Post a Comment